Political

आरोग्य विभागातील बदल्यांमध्ये आणणार पारदर्शकता! : मंत्री प्रकाश आबीटकर

🗓️ ८ जानेवारी २०२६ I 📍मंत्रालय, मुंबई आरोग्य विभागांतर्गत अधिकाऱ्यांच्या बदल्या, बढत्या पारदर्शकपणे राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र (SHSRC) च्या मुल्यांकन प्रणालीनुसार कामगिरीवर आधारित होणार! सार्वजनिक आरोग्य विभागातील विविध प्रशासकीय विषयांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी मंत्रालयातील समिती सभागृहात आढावा बैठक घेतली. या बैठकीत सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची बदली, बढती करताना ‘राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र’  (State Health Systems Resource Centre-SHSRC) च्या प्रणालीनुसार कामगिरीवर आधारित मूल्यांकन अहवालानुसार पारदर्शकपणे करण्याची सूचना केली. तसेच केंद्र शासनाच्या ‘राष्ट्रीय आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र (NHSRC)’ च्या धर्तीवर पुणे येथे कार्यरत असलेले ‘राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र (SHSRC)’ ही संस्था राज्याच्या आरोग्य विभागास तांत्रिक सहकार्य, संशोधन व गुणवत्ता वृद्धीसाठी महत्त्वाचे कार्य करत आहे. SHSRC मार्फत जिल्हा व महापालिका स्तरावरील आरोग्य संस्था तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून प्रशासकीय, तांत्रिक व वित्तीय निकषांवर आधारित मासिक रँकिंग तयार केली जाते. यापुढे सार्वजनिक आरोग्य विभागातील बदल्या व बढत्या करताना या कामगिरीआधारित रँकिंग अहवालाचा आधार घेतला जाणार असून कार्यक्षमता व जबाबदारीला प्राधान्य दिले जाणार आहे. यामुळे आरोग्य सेवा प्रशासन अधिक परिणामकारक व लोकाभिमुख होण्यास मदत होणार आहे. तसेच राज्यातील आरोग्य कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र व राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र, नागरिकांना अधिक दर्जेदार सेवा देण्यासाठी CSR अंतर्गत निधी उभारणीस चालना देणे आवश्यक असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. यासाठी संबंधित विभागांनी CSR देणाऱ्या संस्थांना उद्दिष्टाधारित व स्पष्ट प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेले जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (DPM), जिल्हा लेखा व्यवस्थापक (DAM), एनएचएम सल्लागार व कार्यक्रम अधिकारी यांनी आरोग्य संस्थांना नियमित भेटी देऊन वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा व आवश्यक सुधारणा सुचवाव्यात, अशा सूचना दिल्या. त्याचबरोबर पदभरती, मानव संसाधन व्यवस्थापन व क्षेत्रीय भेटींच्या अहवालांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीस आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव ई.रवींद्रन, आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक डॉ. विजय कंदेवाड, सहसंचालक श्री. राजेंद्र भालेराव, सहसंचालिका डॉ. सुनीता गोल्हाईत, सहसंचालिका डॉ. सरिता हजारे, माजी महासंचालक व सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे, डॉ. मोहन जाधव तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आरोग्य विभागातील बदल्यांमध्ये आणणार पारदर्शकता! : मंत्री प्रकाश आबीटकर Read More »

लवकरच मिळणार पाच लाखापर्यंतच्या मोफत उपचारांचा लाभ

महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानंतर सर्वसामान्य जनता आज लावून बसली होती. या मंत्रिमंडळ बैठकीत अत्यंत महत्त्वाचा असा महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना प्रति कुटुंब प्रति वर्ष पाच लाखांपर्यंतच्या उपचारांचे विमा कवच मिळण्याची घोषणा करण्यात आली होती व अशा अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणेच्या अंमलबजावणीसाठी सर्व जनता शासनाकडे अस लावून बसली होती. काल दिनांक 28 जुलै 2023 रोजी या संबंधि शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून यामुळे सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या शासन निर्णयामुळे सर्व बाधा दूर झाल्या असून आता जुन्या योजनेमधील बदल व सुधारणा करण्याकरिता मार्ग मोकळा झाला आहे ज्यामुळे लवकरच ही सुधारित योजना सर्वांकरिता लागू होऊ शकेल. कोणताही लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याकरता सर्वप्रथम राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याचा निर्णय होणे आवश्यक असते व त्यानंतर शासन निर्णय निर्गमित केला जातो व त्यानंतर तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात येते जेणेकरून योजना राबविताना प्रत्यक्षात कोणत्याही अडचणी उद्भवू नयेत अशा तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यावर तत्काळ लाभार्थ्यांना लाभ मिळणे सहज शक्य होते. अशाच प्रकारे आता लवकरात लवकरच तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात येऊन प्रत्यक्ष लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे नजीकच्या काळात शक्य होईल अशी माहिती योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या राज्य आरोग्य हमी सोसायटी मार्फत प्राप्त झाली आहे.

लवकरच मिळणार पाच लाखापर्यंतच्या मोफत उपचारांचा लाभ Read More »

शासन आपल्या दारी कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी दिली आयुष्यमान भारत योजनेच्या स्टॉलला भेट

शासन आपल्या दारी कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी दिली आयुष्यमान भारत योजनेच्या स्टॉलला भेट Read More »

#Ayushman #Card Distribution & #Health #Camps #Nashik : #नाशिक जिल्हयात आजपासून #आयुष्यमान कार्ड वितरण मोहीम व #महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन

नाशिक : जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत जिल्हयामध्ये १५ ते ३१ डिसेंबर २०२२२ पर्यंत महाआरोग्य  मिळावे घेण्यात येत आहेत. जिल्हाभरातील १०६ प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ५९२ आरोग्य उपकेंद्र, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, यांच्या समन्वयातून हे शिबिर राबवले जाणार आहे. (Mahaarogya camps in district from today Nashik Health Camps) पालकमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हयात महाआरोग्य मेळाव्यांचे आयोजन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा परिषद आरोग्य विभाग, एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, जिल्हा रुग्णालय, सर्व ग्रामीण रुग्णालय यांच्या समन्वयाने हे शिबिर होणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र या ठिकाणी तयारी करण्यात येत आहे. या शिबिरात ग्रामीण भागातील रुग्णांची तपासणी आरोग्य उपकेंद्र स्तरावर समुदाय आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. निदान व उपचार मोफत केले जाणार आहे. तसेच आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचेलाभार्थी असलेल्या लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड बनवून देणे करितामोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी सर्व स्तरावरून पोस्टर बॅनर यामार्फत जनजागृती करण्यात येत आहे. या तपासण्या होतील! आरोग्य शिबिरामध्ये आरोग्य तपासणी हृदयरोग, रक्तदाब, डोळे तपासणी, मोतीबिंदू, टीबी ची तपासणी, दंतरोग, नाक कान घसा, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, हाडांची तपासणी अशा विविध तपासण्या करण्यात येणार आहेत. यामध्ये गुंतागुंत अथवा तज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याची गरज भासल्यास संदर्भ सेवेची सेवा दिली जाणार आहे. ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज आहे, अशांसाठी जानेवारीमध्ये शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. जिल्हा परिषदेतील मुख्यालयातून या शिबिराचे सनियंत्रण केले जाणार असून शक्य तितक्या शस्त्रक्रिया ह्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य  योजने अंतर्गत करण्यात येणार आहेत. पूर्वतयारीसाठी जिल्हास्तरीय परिवेक्षक त्या-त्या तालुक्यांना मार्गदर्शन करीत आहेत. शिबिराची तयारी अंतिम टप्प्यात आली असून या शिबिराचा लाभ जिल्हयातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन जिल्हयाचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी, श्रीमती मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहेते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. कैलास भोये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. युवराज देवरे, एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे क्षेत्रीय व्यवस्थापक डॉ कुलदीप शिरपूरकर, जिल्हा समन्वयक डॉ. पंकज दाभाडे, विभाग प्रमुख डॉ तुषार मोरे, जिल्हा प्रमुख डॉ राहुल सोनवणे व वैद्यकीय अधिकारी डॉ संकीत साखला यांनी केले आहे.

#Ayushman #Card Distribution & #Health #Camps #Nashik : #नाशिक जिल्हयात आजपासून #आयुष्यमान कार्ड वितरण मोहीम व #महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन Read More »

तानाजी सावंत महाराष्ट्राचे नवे आरोग्यमंत्री

यावेळाचे आरोग्यमंत्री पद सोलापूर जिल्ह्याला. नुकतेच महाराष्ट्राच्या मंत्री मंडळाचे खाते वाटप जाहीर झाले आहे. या खाते वाटपात सोलापूर जिल्ह्यातील परांडा येथील आमदार श्री तानाजी सावंत यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य विभागाची जबाबदारी आली आहे.

तानाजी सावंत महाराष्ट्राचे नवे आरोग्यमंत्री Read More »

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.