लवकरच मिळणार पाच लाखापर्यंतच्या मोफत उपचारांचा लाभ

\"\"

महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानंतर सर्वसामान्य जनता आज लावून बसली होती.

या मंत्रिमंडळ बैठकीत अत्यंत महत्त्वाचा असा महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना प्रति कुटुंब प्रति वर्ष पाच लाखांपर्यंतच्या उपचारांचे विमा कवच मिळण्याची घोषणा करण्यात आली होती व अशा अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणेच्या अंमलबजावणीसाठी सर्व जनता शासनाकडे अस लावून बसली होती.

काल दिनांक 28 जुलै 2023 रोजी या संबंधि शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून यामुळे सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या शासन निर्णयामुळे सर्व बाधा दूर झाल्या असून आता जुन्या योजनेमधील बदल व सुधारणा करण्याकरिता मार्ग मोकळा झाला आहे ज्यामुळे लवकरच ही सुधारित योजना सर्वांकरिता लागू होऊ शकेल.

कोणताही लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याकरता सर्वप्रथम राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याचा निर्णय होणे आवश्यक असते व त्यानंतर शासन निर्णय निर्गमित केला जातो व त्यानंतर तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात येते जेणेकरून योजना राबविताना प्रत्यक्षात कोणत्याही अडचणी उद्भवू नयेत अशा तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यावर तत्काळ लाभार्थ्यांना लाभ मिळणे सहज शक्य होते.

अशाच प्रकारे आता लवकरात लवकरच तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात येऊन प्रत्यक्ष लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे नजीकच्या काळात शक्य होईल अशी माहिती योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या राज्य आरोग्य हमी सोसायटी मार्फत प्राप्त झाली आहे.

Scroll to Top