Health News

शासन आपल्या दारी कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी दिली आयुष्यमान भारत योजनेच्या स्टॉलला भेट

शासन आपल्या दारी कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी दिली आयुष्यमान भारत योजनेच्या स्टॉलला भेट Read More »

#Ayushman #Card Distribution & #Health #Camps #Nashik : #नाशिक जिल्हयात आजपासून #आयुष्यमान कार्ड वितरण मोहीम व #महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन

नाशिक : जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत जिल्हयामध्ये १५ ते ३१ डिसेंबर २०२२२ पर्यंत महाआरोग्य  मिळावे घेण्यात येत आहेत. जिल्हाभरातील १०६ प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ५९२ आरोग्य उपकेंद्र, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, यांच्या समन्वयातून हे शिबिर राबवले जाणार आहे. (Mahaarogya camps in district from today Nashik Health Camps) पालकमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हयात महाआरोग्य मेळाव्यांचे आयोजन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा परिषद आरोग्य विभाग, एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, जिल्हा रुग्णालय, सर्व ग्रामीण रुग्णालय यांच्या समन्वयाने हे शिबिर होणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र या ठिकाणी तयारी करण्यात येत आहे. या शिबिरात ग्रामीण भागातील रुग्णांची तपासणी आरोग्य उपकेंद्र स्तरावर समुदाय आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. निदान व उपचार मोफत केले जाणार आहे. तसेच आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचेलाभार्थी असलेल्या लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड बनवून देणे करितामोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी सर्व स्तरावरून पोस्टर बॅनर यामार्फत जनजागृती करण्यात येत आहे. या तपासण्या होतील! आरोग्य शिबिरामध्ये आरोग्य तपासणी हृदयरोग, रक्तदाब, डोळे तपासणी, मोतीबिंदू, टीबी ची तपासणी, दंतरोग, नाक कान घसा, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, हाडांची तपासणी अशा विविध तपासण्या करण्यात येणार आहेत. यामध्ये गुंतागुंत अथवा तज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याची गरज भासल्यास संदर्भ सेवेची सेवा दिली जाणार आहे. ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज आहे, अशांसाठी जानेवारीमध्ये शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. जिल्हा परिषदेतील मुख्यालयातून या शिबिराचे सनियंत्रण केले जाणार असून शक्य तितक्या शस्त्रक्रिया ह्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य  योजने अंतर्गत करण्यात येणार आहेत. पूर्वतयारीसाठी जिल्हास्तरीय परिवेक्षक त्या-त्या तालुक्यांना मार्गदर्शन करीत आहेत. शिबिराची तयारी अंतिम टप्प्यात आली असून या शिबिराचा लाभ जिल्हयातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन जिल्हयाचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी, श्रीमती मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहेते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. कैलास भोये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. युवराज देवरे, एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे क्षेत्रीय व्यवस्थापक डॉ कुलदीप शिरपूरकर, जिल्हा समन्वयक डॉ. पंकज दाभाडे, विभाग प्रमुख डॉ तुषार मोरे, जिल्हा प्रमुख डॉ राहुल सोनवणे व वैद्यकीय अधिकारी डॉ संकीत साखला यांनी केले आहे.

#Ayushman #Card Distribution & #Health #Camps #Nashik : #नाशिक जिल्हयात आजपासून #आयुष्यमान कार्ड वितरण मोहीम व #महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन Read More »

मनपा रुग्णालयांमधील डॉक्टरांच्या टिमवर्कमुळे महिला रुग्णाचे प्राण वाचले, इंदिरा गांधी रुग्णालयातील घटना !

नाशिक : महानगरपालिकेच्या सर्वच रुग्णालयांमध्ये रुग्णांना तत्परतेने सेवा दिली जाते. सर्वच डॉक्टर आणि कर्मचा-यांची सेवाभाव वृत्ती नेहमीच अधोरेखीत झाली आहे. जिल्हयातील लखमापूरच्या एका 36 वर्षीय महिला रुग्णाच्या ऑपरेशननिमित्त पुन्हा एकदा मनपाच्या डॉक्टरांचं टीमवर्क दिसून आले. त्यामुळे सबंधित महिलेचे प्राण वाचले. पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात 27 ऑक्टोबरला गर्भपात करून संततीनियमनाच्या ऑपरेशनसाठी महिला दाखल झाली होती. या ऑपरेशन दरम्यान रुग्णास अतिरक्तस्राव होत असल्याने ऑपरेशन करणाऱ्या डॉ. सोनाली जोखडे यांनी त्वरीत इंदिरा गांधी हॉस्पिटलमधील स्त्री रोग तज्ञ डॉ. रीना काळदाते यांना बोलावून घेतले. दोन्ही डॉक्टरांनी मिळून रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु यश येत नसल्याने अखेर झाकीर हुसेन रुग्णालयातील जनरल सर्जन डॉ. नितीन रावते यांना बोलावण्यात आले. ते सुद्धा लगेचच हजर झाले. त्यांनीही रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु रुग्णाची प्रकृती बिघडत असल्याने आणि रक्तस्त्राव आटोक्यात येत नसल्याने स्त्री रोग तज्ज्ञ आणि मनपाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत शेटे यांना बोलविण्यात आले. संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन उपस्थित डॉक्टरांनी रुग्णाची गर्भपिशवी काढण्याचा निर्णय घेतला. तातडीने गर्भ पिशवी काढण्याचे ऑपरेशन करण्यात आले. त्यामुळे रक्तस्राव थांबून रुग्णाचे प्राण वाचवण्यात यश आले. रुग्णाची प्रकृती बिकट झाल्याने गुंतागुंतीचे हे ऑपरेशन होते. मात्र सर्व डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे महिला रुग्णाचे प्राण वाचल्याचे डॉ. प्रशांत शेटे यांनी सांगितले. आता रुग्णाची प्रकृती उत्तम असल्याची माहिती त्यांनी दिली.  इंदिरा गांधी रुग्णालयातील भुलतज्ञ डॉ. स्नेहल भट आणि आपत्कालीन परिस्थितीत बोलावण्यात आलेल्या मनपाच्या नाशिक रोड येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयातील भुलतज्ञ डॉ. अर्चना बोधले यांचीही डॉक्टरांना मोलाची साथ लाभली. इंदीरा गांधी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय देवकर यांनी परिस्थितीचे नियोजन केले. महिला रुग्णाच्या या ऑपरेशननिमित्त सर्व डॉक्टरांचे उत्तम टिमवर्क दिसून आले. यापुढेही सगळ्याच रुग्णांप्रती असाच सेवाभाव असणार आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या सुचनेनुसार नागरिकांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा प्रयत्न असणार असल्याचे मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी म्हटले आहे.

मनपा रुग्णालयांमधील डॉक्टरांच्या टिमवर्कमुळे महिला रुग्णाचे प्राण वाचले, इंदिरा गांधी रुग्णालयातील घटना ! Read More »

आयुष्यमान कार्डावर मिळेल पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार !

लाभ घ्या एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना चा! पिवळे, केशरी, अंत्योदय, अन्नपूर्णा शिधापत्रिका धारक कुटुंब असाल तर आपल्याला मिळेल दीड लाखापर्यंत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ! व आपण असाल आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभार्थी तर मिळेल पाच लक्ष रुपयांपर्यंतचा लाभ! आपण आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभार्थी आहात की नाही हे जाणून घेण्यासाठीMera PMJAYhttps://mera.pmjay.gov.in/search/loginअथवा Aapke Dwar Ayushmanhttps://aapkedwarayushman.pmjay.gov.in/AapkeDwar/ या वेबसाईटवर लॉगिन करा अथवा14555 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा आणि आपणरील योजनेचे लाभार्थी आहात की नाही हे तपासून बघा! आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठीआपल्याकडे आयुष्यमान कार्ड असणे आवश्यक आहे. आयुष्यमानहे आयुष्यमान कार्ड बनवून घेण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय अथवा योजनेमध्ये समाविष्ट रुग्णालये येथे जाऊन आपल्या आयुष्यमान कार्ड बनवून घ्या आणि उपचाराच्या खर्चापासून मुक्त व्हा! असे आवाहनएकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे नाशिक विभागाचे क्षेत्रीय व्यवस्थापक डॉ. कुलदीप शिरपूरकर यांनी केले आहे.

आयुष्यमान कार्डावर मिळेल पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार ! Read More »

नंदुरबार जिल्ह्यातील आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी केंद्र समुदाय आरोग्य अधिकारी यांचे काम बंद आंदोलन

@healthschemeinfo #Ayushman Bharat Nandurbar: आरोग्य उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरु झाले असून जिल्‍ह्याची आरोग्‍य यंत्रणा कोलमडली आहे. आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र नंदुरबार जिल्ह्यातील सर्व समुदाय आरोग्य अधिकारी यांच्यावर अन्याय होत असल्याचा दावा करत होणाऱ्या अन्यायाबाबत प्रशासनाने दखल घेतलेली नाही असा थापका ठेवून यामुळे समुदाय आरोग्य कर्मचाऱ्यांच्यावतीने जिल्हा परिषद (Zilha Parishad) कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत काम बंद व धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. नंदुरबार जिल्हा परिषद (Nandurbar ZP) आरोग्य विभाग उपकेंद्र अंतर्गत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या समुदाय आरोग्य कर्मचाऱ्यांना इन्सेंटिव्ह व हार्ड शिप आणि दरमहा मिळणारे वेतन वेळेत दिले जात नाही. सदर वेतन महिन्याच्या १० तारखेच्‍या आत द्यावे. या प्रमुख मागण्यासाठी समुदाय आरोग्य कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद धरणे आंदोलन सुरू केले आहे. नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील ३४ आरोग्य उपकेंद्रात कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी गैरहजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. त्याचा समुदाय आरोग्य कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनाशी काही संबंध नाही असा दावा संघटनेचे अध्यक्ष डॉ. तुषार धामणे यांनी केला असल्याचे समजते. वेतन अदा समुदाय आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बेमुदत काम बंद धरणे आंदोलनामुळे आरोग्य सुविधेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने याबाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना विचारले असता. सदर कर्मचाऱ्यांना वारंवार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली इन्सेंटिव्ह व हार्डशिप व वेतन अदा केलेले आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या आर्थिक नियोजनानुसार सदर कार्यवाही सुरू आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अहवाल शनिवारी संध्याकाळी प्राप्त झाला असून लवकरच पुढील कार्यवाही देखील सुरू होणार असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली असल्याचे कळत आहे. Ayushman Bharat HWC

नंदुरबार जिल्ह्यातील आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी केंद्र समुदाय आरोग्य अधिकारी यांचे काम बंद आंदोलन Read More »

तानाजी सावंत महाराष्ट्राचे नवे आरोग्यमंत्री

यावेळाचे आरोग्यमंत्री पद सोलापूर जिल्ह्याला. नुकतेच महाराष्ट्राच्या मंत्री मंडळाचे खाते वाटप जाहीर झाले आहे. या खाते वाटपात सोलापूर जिल्ह्यातील परांडा येथील आमदार श्री तानाजी सावंत यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य विभागाची जबाबदारी आली आहे.

तानाजी सावंत महाराष्ट्राचे नवे आरोग्यमंत्री Read More »

\”जन आरोग्य\” योजनेला दहा वर्षे पूर्ण

महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्त्वकांक्षी असलेली अशी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना. या योजनेला आज दहा वर्षे पूर्ण झाले आहेत. अत्यंत यशस्वी आणि फलदायी अशी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची सुरुवात 2 जुलै 2012 रोजी मूलतः राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या नावाने प्रायोगिक तत्त्वावर आठ जिल्ह्यांमध्ये करण्यात आली आणि कालांतराने 21 नोव्हेंबर 2013 रोजी ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आली. कालांतराने योजनेचे नाव बदलून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ठेवण्यात आले व काही काळाने त्यात थोडासा बदल करून सदरील योजनेचे नाव महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना असे ठेवण्यात आले. केंद्र शासनाने संपूर्ण भारतभर अशाच प्रकारे आरोग्य योजना लागू करण्यासाठी अभ्यास सुरू केला असताना विविध राज्यातील विविध योजनांचा यामध्ये अभ्यास करण्यात आला व त्यात प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा अभ्यास करण्यात आला. पूर्ण अभ्यासांती केंद्र शासनाने 23 सप्टेंबर 2018 रोजी संपूर्ण भारत देशात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू केली त्याचवेळी महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेशी एकत्रीकरण करून महाराष्ट्रात या दोन्ही योजना एकत्रित स्वरूपात एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या नावाने लागू करण्यात आल्या. मूलतः लागू करण्यात आलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा आधार हा शिधापत्रिका अर्थात रेशन कार्ड ठेवण्यात आला व यामध्ये पिवळे केशरी अंत्योदय व अन्नपूर्णा या चार प्रकारच्या शिधापत्रिकाधारकांना लाभार्थी म्हणून घोषित करण्यात आले याचबरोबर या सर्व शिधापत्रिका धारकांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना कार्ड देण्यात आले परंतु कालांतराने योजनेचे नाव बदलले व त्यानंतर शिधापत्रिका अर्थात रेशन कार्ड हाच आधार मानला जाऊ लागला. संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत सुरुवातीला साडेतीनशे रुग्णालयांची मर्यादा ठेवण्यात आली परंतु कालांतराने ही मर्यादा वाढत 500 वर नेण्यात आली व त्यानंतर सद्यस्थितीत ही मर्यादा 1000 वर नेण्यात आली आहे. मूळ योजना ही पूर्णपणे इन्शुरन्स मोडवर आधारित होती योजनेच्या सुरुवातीपासून ते 2020 पर्यंत ही योजना नॅशनल इन्शुरन्स कंपनी या शासनाच्या एका इन्शुरन्स कंपनीमार्फत राबविण्यात आली व तदनंतर 2020 पासून पुढे ही योजना शासनाच्या युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. प्रत्यक्षात योजना राबविण्याकरता या इन्शुरन्स कंपन्यांमार्फत सुरुवातीला तीन टीपीए अर्थात थर्ड पार्टी इन्शुरन्स कंपनीची नेमणूक करण्यात आली. या तीन कंपन्या म्हणजे एमडी इंडिया टीपीए, मेडियासिस्ट टीपीए आणि पॅरामाउंट टीपीए. कालांतराने 2020 नंतर हेल्थ इंडिया ही टीपीएस सुद्धा योजनेची जोडल्या गेली अशा प्रकारे आज संपूर्ण महाराष्ट्राला राज्य शासनाच्या या योजनेअंतर्गत इन्शुरन्स कंपनीमार्फत या चारही टीपीए सेवा पुरवत आहेत. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची सलग्निकरण करण्यात आले त्यावेळेस आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांचा अतिरिक्त लाभ हा अशुरन्स मोडवर देण्याचे शासनाने ठरविले व यासोबतच पुढील काळात कोरोना महामारी मुळे योजनेमध्ये बरेच बदल करण्यात आले व ही योजना महाराष्ट्रातील सर्वच नागरिकांसाठी मुक्त करण्यात आली त्यावेळी हा अतिरिक्त भार शासनाने स्वतः उचलून अशुरन्स मोडवर अतिरिक्त लाभ देण्यात आला. वरळी येथील कामगार रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर सुरू झालेल्या या योजनेची कालांतराने व्याप्ती वाढत गेली व शासनाने कामगार रुग्णालयाच्या परिसरातच सदरील योजनेकरिता स्वतंत्र इमारत उभारली जिचे नाव \”जीवनदायी भवन\” ठेवण्यात आले जे आज खरोखर रुग्णांसाठी जीवनदायी ठरत आहे. योजना खरोखर यशस्वी ठरण्यामागे शासनासोबतच योजना प्रमुखांचा तसेच जीवनदायी कार्यालयामध्ये कार्यरत व प्रत्यक्षात जिल्हास्तरावर कार्यरत अधिकाऱ्यांचा फार मोठा सहभाग आहे. एवढेच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध ग्रामीण भागात रुग्णांना लाभ मिळवून देणाऱ्या आरोग्य मित्रांचा तसेच प्रत्यक्षात शासनाच्या योजनेची अंमलबजावणी करून रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध करून देणाऱ्या रुग्णालयांचाही या यशामध्ये विशेष वाटा आहे. अशा या शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ सर्व गरजूंनी घेणे आवश्यकच आहे याकरिता शासनाने 155 388 हा टोल फ्री क्रमांक लाभार्थ्यांसाठी देऊ केला आहे. या क्रमांकावर योजनेमध्ये प्राप्त होत असलेले विविध उपचार तसेच योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली रुग्णालये यासंबंधी सविस्तर माहिती प्राप्त होते. https://www.jeevandayee.gov.in https://www.pmjay.gov.in

\”जन आरोग्य\” योजनेला दहा वर्षे पूर्ण Read More »

\”जन आरोग्य\” योजनेला दहा वर्षे पूर्ण

महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्त्वकांक्षी असलेली अशी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना. या योजनेला आज दहा वर्षे पूर्ण झाले आहेत. अत्यंत यशस्वी आणि फलदायी अशी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची सुरुवात 2 जुलै 2012 रोजी मूलतः राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या नावाने प्रायोगिक तत्त्वावर आठ जिल्ह्यांमध्ये करण्यात आली आणि कालांतराने 21 नोव्हेंबर 2013 रोजी ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आली. कालांतराने योजनेचे नाव बदलून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ठेवण्यात आले व काही काळाने त्यात थोडासा बदल करून सदरील योजनेचे नाव महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना असे ठेवण्यात आले. केंद्र शासनाने संपूर्ण भारतभर अशाच प्रकारे आरोग्य योजना लागू करण्यासाठी अभ्यास सुरू केला असताना विविध राज्यातील विविध योजनांचा यामध्ये अभ्यास करण्यात आला व त्यात प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा अभ्यास करण्यात आला. पूर्ण अभ्यासांती केंद्र शासनाने 23 सप्टेंबर 2018 रोजी संपूर्ण भारत देशात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू केली त्याचवेळी महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेशी एकत्रीकरण करून महाराष्ट्रात या दोन्ही योजना एकत्रित स्वरूपात एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या नावाने लागू करण्यात आल्या. मूलतः लागू करण्यात आलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा आधार हा शिधापत्रिका अर्थात रेशन कार्ड ठेवण्यात आला व यामध्ये पिवळे केशरी अंत्योदय व अन्नपूर्णा या चार प्रकारच्या शिधापत्रिकाधारकांना लाभार्थी म्हणून घोषित करण्यात आले याचबरोबर या सर्व शिधापत्रिका धारकांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना कार्ड देण्यात आले परंतु कालांतराने योजनेचे नाव बदलले व त्यानंतर शिधापत्रिका अर्थात रेशन कार्ड हाच आधार मानला जाऊ लागला. संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत सुरुवातीला साडेतीनशे रुग्णालयांची मर्यादा ठेवण्यात आली परंतु कालांतराने ही मर्यादा वाढत 500 वर नेण्यात आली व त्यानंतर सद्यस्थितीत ही मर्यादा 1000 वर नेण्यात आली आहे. मूळ योजना ही पूर्णपणे इन्शुरन्स मोडवर आधारित होती योजनेच्या सुरुवातीपासून ते 2020 पर्यंत ही योजना नॅशनल इन्शुरन्स कंपनी या शासनाच्या एका इन्शुरन्स कंपनीमार्फत राबविण्यात आली व तदनंतर 2020 पासून पुढे ही योजना शासनाच्या युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. प्रत्यक्षात योजना राबविण्याकरता या इन्शुरन्स कंपन्यांमार्फत सुरुवातीला तीन टीपीए अर्थात थर्ड पार्टी इन्शुरन्स कंपनीची नेमणूक करण्यात आली. या तीन कंपन्या म्हणजे एमडी इंडिया टीपीए, मेडियासिस्ट टीपीए आणि पॅरामाउंट टीपीए. कालांतराने 2020 नंतर हेल्थ इंडिया ही टीपीएस सुद्धा योजनेची जोडल्या गेली अशा प्रकारे आज संपूर्ण महाराष्ट्राला राज्य शासनाच्या या योजनेअंतर्गत इन्शुरन्स कंपनीमार्फत या चारही टीपीए सेवा पुरवत आहेत. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची सलग्निकरण करण्यात आले त्यावेळेस आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांचा अतिरिक्त लाभ हा अशुरन्स मोडवर देण्याचे शासनाने ठरविले व यासोबतच पुढील काळात कोरोना महामारी मुळे योजनेमध्ये बरेच बदल करण्यात आले व ही योजना महाराष्ट्रातील सर्वच नागरिकांसाठी मुक्त करण्यात आली त्यावेळी हा अतिरिक्त भार शासनाने स्वतः उचलून अशुरन्स मोडवर अतिरिक्त लाभ देण्यात आला. वरळी येथील कामगार रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर सुरू झालेल्या या योजनेची कालांतराने व्याप्ती वाढत गेली व शासनाने कामगार रुग्णालयाच्या परिसरातच सदरील योजनेकरिता स्वतंत्र इमारत उभारली जिचे नाव \”जीवनदायी भवन\” ठेवण्यात आले जे आज खरोखर रुग्णांसाठी जीवनदायी ठरत आहे. योजना खरोखर यशस्वी ठरण्यामागे शासनासोबतच योजना प्रमुखांचा तसेच जीवनदायी कार्यालयामध्ये कार्यरत व प्रत्यक्षात जिल्हास्तरावर कार्यरत अधिकाऱ्यांचा फार मोठा सहभाग आहे. एवढेच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध ग्रामीण भागात रुग्णांना लाभ मिळवून देणाऱ्या आरोग्य मित्रांचा तसेच प्रत्यक्षात शासनाच्या योजनेची अंमलबजावणी करून रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध करून देणाऱ्या रुग्णालयांचाही या यशामध्ये विशेष वाटा आहे. अशा या शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ सर्व गरजूंनी घेणे आवश्यकच आहे याकरिता शासनाने 155 388 हा टोल फ्री क्रमांक लाभार्थ्यांसाठी देऊ केला आहे. या क्रमांकावर योजनेमध्ये प्राप्त होत असलेले विविध उपचार तसेच योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली रुग्णालये यासंबंधी सविस्तर माहिती प्राप्त होते. https://www.jeevandayee.gov.in https://www.pmjay.gov.in

\”जन आरोग्य\” योजनेला दहा वर्षे पूर्ण Read More »

\”जन आरोग्य\” योजनेला दहा वर्षे पूर्ण

महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्त्वकांक्षी असलेली अशी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना. या योजनेला आज दहा वर्षे पूर्ण झाले आहेत. अत्यंत यशस्वी आणि फलदायी अशी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची सुरुवात 2 जुलै 2012 रोजी मूलतः राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या नावाने प्रायोगिक तत्त्वावर आठ जिल्ह्यांमध्ये करण्यात आली आणि कालांतराने 21 नोव्हेंबर 2013 रोजी ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आली. कालांतराने योजनेचे नाव बदलून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ठेवण्यात आले व काही काळाने त्यात थोडासा बदल करून सदरील योजनेचे नाव महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना असे ठेवण्यात आले. केंद्र शासनाने संपूर्ण भारतभर अशाच प्रकारे आरोग्य योजना लागू करण्यासाठी अभ्यास सुरू केला असताना विविध राज्यातील विविध योजनांचा यामध्ये अभ्यास करण्यात आला व त्यात प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा अभ्यास करण्यात आला. पूर्ण अभ्यासांती केंद्र शासनाने 23 सप्टेंबर 2018 रोजी संपूर्ण भारत देशात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू केली त्याचवेळी महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेशी एकत्रीकरण करून महाराष्ट्रात या दोन्ही योजना एकत्रित स्वरूपात एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या नावाने लागू करण्यात आल्या. मूलतः लागू करण्यात आलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा आधार हा शिधापत्रिका अर्थात रेशन कार्ड ठेवण्यात आला व यामध्ये पिवळे केशरी अंत्योदय व अन्नपूर्णा या चार प्रकारच्या शिधापत्रिकाधारकांना लाभार्थी म्हणून घोषित करण्यात आले याचबरोबर या सर्व शिधापत्रिका धारकांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना कार्ड देण्यात आले परंतु कालांतराने योजनेचे नाव बदलले व त्यानंतर शिधापत्रिका अर्थात रेशन कार्ड हाच आधार मानला जाऊ लागला. संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत सुरुवातीला साडेतीनशे रुग्णालयांची मर्यादा ठेवण्यात आली परंतु कालांतराने ही मर्यादा वाढत 500 वर नेण्यात आली व त्यानंतर सद्यस्थितीत ही मर्यादा 1000 वर नेण्यात आली आहे. मूळ योजना ही पूर्णपणे इन्शुरन्स मोडवर आधारित होती योजनेच्या सुरुवातीपासून ते 2020 पर्यंत ही योजना नॅशनल इन्शुरन्स कंपनी या शासनाच्या एका इन्शुरन्स कंपनीमार्फत राबविण्यात आली व तदनंतर 2020 पासून पुढे ही योजना शासनाच्या युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. प्रत्यक्षात योजना राबविण्याकरता या इन्शुरन्स कंपन्यांमार्फत सुरुवातीला तीन टीपीए अर्थात थर्ड पार्टी इन्शुरन्स कंपनीची नेमणूक करण्यात आली. या तीन कंपन्या म्हणजे एमडी इंडिया टीपीए, मेडियासिस्ट टीपीए आणि पॅरामाउंट टीपीए. कालांतराने 2020 नंतर हेल्थ इंडिया ही टीपीएस सुद्धा योजनेची जोडल्या गेली अशा प्रकारे आज संपूर्ण महाराष्ट्राला राज्य शासनाच्या या योजनेअंतर्गत इन्शुरन्स कंपनीमार्फत या चारही टीपीए सेवा पुरवत आहेत. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची सलग्निकरण करण्यात आले त्यावेळेस आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांचा अतिरिक्त लाभ हा अशुरन्स मोडवर देण्याचे शासनाने ठरविले व यासोबतच पुढील काळात कोरोना महामारी मुळे योजनेमध्ये बरेच बदल करण्यात आले व ही योजना महाराष्ट्रातील सर्वच नागरिकांसाठी मुक्त करण्यात आली त्यावेळी हा अतिरिक्त भार शासनाने स्वतः उचलून अशुरन्स मोडवर अतिरिक्त लाभ देण्यात आला. वरळी येथील कामगार रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर सुरू झालेल्या या योजनेची कालांतराने व्याप्ती वाढत गेली व शासनाने कामगार रुग्णालयाच्या परिसरातच सदरील योजनेकरिता स्वतंत्र इमारत उभारली जिचे नाव \”जीवनदायी भवन\” ठेवण्यात आले जे आज खरोखर रुग्णांसाठी जीवनदायी ठरत आहे. योजना खरोखर यशस्वी ठरण्यामागे शासनासोबतच योजना प्रमुखांचा तसेच जीवनदायी कार्यालयामध्ये कार्यरत व प्रत्यक्षात जिल्हास्तरावर कार्यरत अधिकाऱ्यांचा फार मोठा सहभाग आहे. एवढेच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध ग्रामीण भागात रुग्णांना लाभ मिळवून देणाऱ्या आरोग्य मित्रांचा तसेच प्रत्यक्षात शासनाच्या योजनेची अंमलबजावणी करून रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध करून देणाऱ्या रुग्णालयांचाही या यशामध्ये विशेष वाटा आहे. अशा या शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ सर्व गरजूंनी घेणे आवश्यकच आहे याकरिता शासनाने 155 388 हा टोल फ्री क्रमांक लाभार्थ्यांसाठी देऊ केला आहे. या क्रमांकावर योजनेमध्ये प्राप्त होत असलेले विविध उपचार तसेच योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली रुग्णालये यासंबंधी सविस्तर माहिती प्राप्त होते. https://www.jeevandayee.gov.in https://www.pmjay.gov.in

\”जन आरोग्य\” योजनेला दहा वर्षे पूर्ण Read More »

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या वतीने राज्यस्तरीय आरोग्य जनजागृती परिषदेचे आयोजन

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या वतीने राज्यस्तरीय आरोग्य जनजागृती परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या समारोपाच्या कार्यक्रमात बोलताना \”आरोग्यमंत्री आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणालेधर्मादाय रुग्णालयांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ते बदल केले जातील. यासाठी धर्मादाय कायद्यातील कलमात आवश्यक बदल करुन या योजनेसाठी किमान तीस टक्के खाटा उपलब्ध होतील, यासाठी प्रयत्न करु.\” विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी धर्मादाय दवाखान्यातून शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी काय करता येईल यावर विचार केला जाईल, असे सांगितले. दिव्यांग नागरिकांना तालुका स्तरावर दाखले देण्यासाठी व्यवस्था केली जावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या वतीने राज्यस्तरीय आरोग्य जनजागृती परिषदेचे आयोजन Read More »

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.