कामात कुचराई करणाऱ्यांची गय नाही; शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवा – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव
बुलढाण्यात आरोग्य विभागाच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत स्पष्ट निर्देश बुलढाणा, ४ जुलै:गोरगरीब आणि शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, माफक आणि सुलभ आरोग्य सेवा पोहोचवणे हे केंद्र सरकारचे मुख्य उद्दिष्ट असून, या उद्दिष्ट पूर्तीसाठी आरोग्य यंत्रणेला प्रामाणिकपणे कार्य करावे लागेल. कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कोणतीही गय न ठेवता कठोर कारवाई करा, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार), आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित झालेल्या जिल्हास्तरीय आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत मंत्री महोदयांनी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला. बैठकीत प्रमुख उपस्थिती: मंत्री महोदयांचे महत्त्वाचे निर्देश: 🔹 रिक्त पदे तात्काळ भरा – जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये रिक्त पदांचा आढावा घेऊन आवश्यक ती भरती तातडीने पार पाडा.🔹 PMJAY अंतर्गत शिबिरे घ्या – आयुष्मान भारत योजनेंतर्गत ई-केवायसी व कार्ड नोंदणीसाठी ग्रामपंचायत व तालुकास्तरावर विशेष शिबिरे आयोजित करा.🔹 जन औषधी व अमृत औषधालये सुरू करा – जिल्हा रुग्णालयात तत्काळ सुविधा उपलब्ध करून द्या.🔹 नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कारवाई – आरोग्यसेवेत दोष आढळल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होईल.🔹 ‘निक्षयमित्र’ योजनेत सर्वांचा सहभाग – क्षयरोग निर्मूलनासाठी स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांचा सक्रिय सहभाग आवश्यक.🔹 ग्रामीण आरोग्य सुविधांची गुणवत्ता वाढवा – प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये भौतिक सुविधा आणि इमारती दर्जेदार असाव्यात.🔹 जन्मदर व मृत्युदराचा बारकाईने अभ्यास – सुधारणा आवश्यक त्या ठिकाणी त्वरित कृती करा. सर्व विभाग प्रमुखांना एकजूटने काम करण्याचे आवाहन मंत्री महोदयांनी सर्व आरोग्य यंत्रणेला सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन करत, “शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी कामात कुचराई खपवून घेतली जाणार नाही”, असा इशाराही दिला.










