मोठी बातमी! ‘आयुष्यमान भारत’ योजनेतून आता रुग्णांना 1356 आजारांवर 5 लाखांचे मोफत उपचार, वाचा काय आहे नेमकी योजना, कोणाला मिळू शकतो लाभ आणि बनवून घ्या स्वतःच्या ‘आयुष्मान कार्ड’ स्वतःच !

नाशिक : आयुष्यमान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजना आता एकत्रितपणे राबविली जात असून त्यामधून प्रत्येक कुटुंबातील रुग्णास १३५६ आजारांवर मोफत उपचाराची संधी आहे. नवजात शिशुपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वजण या योजनेचा लाभ घेवू शकतात.
रुग्णांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन केंद्र व राज्य सरकारने प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी पाच लाख रुपयांचे मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील प्रत्येक घटकाला शासनाच्या माध्यमातून मोफत उपचार मिळावेत, या हेतूने आयुष्यमान भारत योजनेचा निर्णय झाला. राज्य सरकारने गतवर्षी महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना एकत्रित राबविण्याचा निर्णय घेतला. सरकारी नोकरदारापासून सामान्य व्यक्तींपर्यंत सर्वांनाच आता ही योजना लागू आहे. पिवळे, केशरी, शुभ्र रेशनकार्ड असलेल्या कुटुंबातील व्यक्ती देखील \’आयुष्यमान कार्ड\’ काढून योजनेचा लाभ घेवू शकतो.

सध्या जिल्ह्यातील 78 रुग्णालयात या योजनेतून मोफत पाच लाखांपर्यंत उपचार मिळतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित कुटुंबातील रुग्णाने गावातील ऑनलाइन सेवा केंद्रातून आशाताईंमार्फत आयुष्यमान कार्ड काढून घेणे आवश्यक आहे. एवढेच नव्हे तर लाभार्थी स्वतः आहे मोबाईलवर आयुष्यमान ॲप डाऊनलोड करून स्वतःचे व आपल्या परिजनांचे आयुष्मान कार्ड बनवून घेऊ शकतात.

जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये 07

जिल्ह्यातील खासगी रुग्णालये 71

\"\"

आयुष्यमान कार्ड बनवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आयुष्यमान ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.

Scroll to Top