Ayushman Card

महाराष्ट्राच्या आरोग्यसेवेत क्रांती : महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेत मोठे बदल

महाराष्ट्र सरकारने राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियामक परिषदेच्या बैठकीत महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (MJPJAY) आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (PMJAY) या दोन्ही योजनांमध्ये क्रांतिकारक सुधारणा जाहीर करण्यात आल्या. या निर्णयांमुळे केवळ उपचारांची संख्या व पॅकेजेसच वाढणार नाहीत, तर रुग्णालयांना योग्य मोबदला मिळेल, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होईल आणि सर्वसामान्य रुग्णांना अधिक व्यापक व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे. बैठकीतील प्रमुख निर्णय 🔹 उपचारांची संख्या दुप्पट 🔹 कॉर्पस फंडची स्थापना 🔹 रुग्णालयांचा सहभाग वाढला 🔹 उपचारांच्या दरात वाढ 🔹 आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कोणाला मिळणार लाभ? आरोग्यसेवेत मोठा बदल का? निष्कर्ष महाराष्ट्रातील या सुधारित महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमुळे लाखो गरजू कुटुंबांना मोफत, दर्जेदार आणि व्यापक आरोग्यसेवा मिळणार आहे.ही केवळ एक योजना नाही, तर सर्वसामान्यांचा आरोग्य हक्क मजबूत करणारे पाऊल आहे. 👉 या सुधारणांमुळे महाराष्ट्र आरोग्य सेवेत देशाला नवा आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्राच्या आरोग्यसेवेत क्रांती : महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेत मोठे बदल Read More »

Govt of India poster featuring Prime Minister Narendra Modi and other officials promoting health awareness and medical services in Maharashtra, India.

नाशिक मधील इंदिरानगर येथे प्रेम मंदिर देखावा आणि आरोग्य शिबिराचे आयोजन

नाशिकच्या इंदिरानगर भागात भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन

नाशिक मधील इंदिरानगर येथे प्रेम मंदिर देखावा आणि आरोग्य शिबिराचे आयोजन Read More »

जालना जिल्ह्यात सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘आरोग्यमित्रां’मार्फत ‘आयुष्मान भारत’ व ‘वय वंदना’ कार्डसाठी ई-केवायसी मोहिम राबविण्यात येणार – जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे आवाहन

जालना, ता. 30 जुलै 2025:जालना जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘आरोग्यमित्रां’मार्फत ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ व ‘वय वंदना योजना’ अंतर्गत लाभार्थ्यांची ई-केवायसी नोंदणी मोहीम हाती घेण्यात आली असून, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने सर्व जनतेला या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातून प्राप्त माहितीनुसार, दिनांक 25 जुलै 2025 पर्यंत जालना जिल्ह्यात ‘आयुष्मान भारत’ योजनेअंतर्गत एकूण 18 लाख 34 हजार लाभार्थी पात्र आहेत. यापैकी फक्त 6 लाख 34 हजार लाभार्थ्यांची कार्ड निर्मिती पूर्ण झाली आहे, तर उर्वरित 11 लाख 96 हजार लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे ही प्रक्रिया त्वरीत पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे. यासोबतच केंद्र सरकारच्या ‘वय वंदना योजना’अंतर्गत वय वर्ष 70 किंवा त्याहून अधिक असलेल्या सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. वय वंदना योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या आजारांवर रु. 5 लाखांपर्यंतचे मोफत उपचार आयुष्यमान भारत योजनेप्रमाणेच ‘अंगीकृत खासगी व शासकीय रुग्णालयां’मध्ये मिळणार आहेत. ई-केवायसी नोंदणीसाठी ठिकाणे व वेळापत्रक: आरोग्यमित्र हे दर बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार या दिवशी खालील शासकीय कार्यालयांमध्ये उपस्थित राहतील: तसेच आपल्या गावातील आशा स्वयंसेविका, स्वस्त धान्य दुकानदार, आपले सरकार सेवा केंद्र, आणि योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालये येथेही आरोग्यमित्र भेट देतील. या माध्यमातून नागरिकांनी आपली ई-केवायसी त्वरित करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. आयुष्मान भारत योजनेविषयी थोडक्यात: ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असून दि. 23 सप्टेंबर 2018 पासून महाराष्ट्रात ‘महत्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’सोबत एकत्रितपणे राबविली जात आहे. या योजनेतून पात्र लाभार्थ्यांना रु. 1 लाखांपर्यंतचा मोफत उपचार शासकीय किंवा खासगी अंगीकृत रुग्णालयात मिळतो. वय वंदना योजना विषयी: ‘वय वंदना योजना’ अंतर्गत 70 वर्षे व त्यावरील सर्व नागरिकांना रु. 5 लाखांपर्यंतचे मोफत उपचार दिले जातात. या योजनेसाठी वेगळ्या प्रकारचे कार्ड दिले जात असून त्यासाठी सुद्धा ई-केवायसी आवश्यक आहे. नागरिकांना सूचना: ही संपूर्ण प्रक्रिया मोफत असून नागरिकांनी दलाल किंवा एजंटांकडे जाणे टाळावे.

जालना जिल्ह्यात सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘आरोग्यमित्रां’मार्फत ‘आयुष्मान भारत’ व ‘वय वंदना’ कार्डसाठी ई-केवायसी मोहिम राबविण्यात येणार – जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे आवाहन Read More »

आरोग्य योजनेची व्याप्ती वाढण्याची शक्यता

एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे व्याप्ती लवकरच वाढण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून कळाले आहे यामध्ये आजारांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असून रुग्णालयांच्या संख्येतही वाढ होणार आहे.

आरोग्य योजनेची व्याप्ती वाढण्याची शक्यता Read More »

मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांच्या प्रेरणेने राज्यातील सर्व रुग्णालयांना सुवर्णसंधी!

🏥 मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांच्या प्रेरणेने राज्यातील सर्व रुग्णालयांना सुवर्णसंधी! आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना – महात्मा फुले जन आरोग्य योजनांमध्ये सहभागी होण्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांचे खुले आवाहन महाराष्ट्रातील आरोग्यसेवा अधिक बळकट करण्यासाठी आणि सामान्य जनतेला मोफत उच्च दर्जाच्या आरोग्य सेवांचा लाभ देण्यासाठी, माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि माननीय आरोग्यमंत्री श्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रेरणेतून राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अण्णासाहेब चव्हाण यांनी राज्यभरातील सर्व खासगी व सरकारी रुग्णालयांना ‘आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB PM-JAY)’ तसेच ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY)’ मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 🔹 मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी किमान 30 खाटांची तर सिंगल स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी 10 खाटांची आवश्यकता आहे.🔹 ग्रामीण आणि दूरदराजच्या भागातील रुग्णालयांनीही पुढाकार घेऊन जनतेसाठी ह्या योजनांचा लाभ पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हास्तरावरील सशक्त प्रयत्न राज्य शासनाच्या या व्यापक मोहिमेमध्ये प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी (District Collector) — जे योजनेच्या सनियंत्रण समितीचे अध्यक्ष आहेत — व जिल्हा शल्य चिकित्सक/अध्यक्ष तसेच सदस्य सचिव, सक्रियपणे रुग्णालयांना योजना समाविष्ट करण्याचे मार्गदर्शन करत आहेत. सामाजिक उत्तरदायित्वाचे भान! आरोग्य सेवा देणाऱ्या संस्थांनी समाजाच्या गरजांचा विचार करून, अल्पभुती व आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी या योजनांमध्ये सहभागी होणे ही केवळ जबाबदारी नाही, तर एक सामाजिक उत्तरदायित्व देखील आहे. लाभ काय? ✅ पॅनेलवर आल्यानंतर रुग्णालयांना शासकीय योजनांखाली अधिकाधिक रुग्ण मिळतात✅ शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार दर निश्चित केले जातात✅ डिजिटल क्लेम्स, पारदर्शक प्रक्रिया आणि निश्चित पेमेंट सायकल 📞 अधिक माहितीसाठी संपर्क साधा! ही केवळ योजना नव्हे, तर आपल्या रुग्णालयाच्या विकासाची, समाजसेवेची आणि आर्थिक स्थैर्याची एक मोठी संधी आहे!आजच पुढाकार घ्या… लोकसेवेच्या या यज्ञात सहभागी व्हा! योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता ऑनलाइन एप्लीकेशन करण्याकरता खालील लिंक वर क्लिक करा. https://www.jeevandayee.gov.in/MJPJAY/empanelment/Eligibility.jsp योजनेमध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व अटी यांसाठी जिल्हा समन्वयक (District Coordinator) व क्षेत्रीय व्यवस्थापक (Regional Manager) यांच्याशी त्वरित संपर्क साधावा. जिल्ह्याचे नाव, जिल्हा समन्वयक आणि त्यांचा संपर्क क्रमांक तसेच विभागाचे नाव, क्षेत्रीय व्यवस्थापक आणि त्यांचा संपर्क क्रमांक यादी खालीलप्रमाणे आहे:जिल्हा समन्वयक (जिल्हानिहाय)

मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांच्या प्रेरणेने राज्यातील सर्व रुग्णालयांना सुवर्णसंधी! Read More »

कामात कुचराई करणाऱ्यांची गय नाही; शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवा – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

बुलढाण्यात आरोग्य विभागाच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत स्पष्ट निर्देश बुलढाणा, ४ जुलै:गोरगरीब आणि शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, माफक आणि सुलभ आरोग्य सेवा पोहोचवणे हे केंद्र सरकारचे मुख्य उद्दिष्ट असून, या उद्दिष्ट पूर्तीसाठी आरोग्य यंत्रणेला प्रामाणिकपणे कार्य करावे लागेल. कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कोणतीही गय न ठेवता कठोर कारवाई करा, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार), आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित झालेल्या जिल्हास्तरीय आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत मंत्री महोदयांनी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला. बैठकीत प्रमुख उपस्थिती: मंत्री महोदयांचे महत्त्वाचे निर्देश: 🔹 रिक्त पदे तात्काळ भरा – जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये रिक्त पदांचा आढावा घेऊन आवश्यक ती भरती तातडीने पार पाडा.🔹 PMJAY अंतर्गत शिबिरे घ्या – आयुष्मान भारत योजनेंतर्गत ई-केवायसी व कार्ड नोंदणीसाठी ग्रामपंचायत व तालुकास्तरावर विशेष शिबिरे आयोजित करा.🔹 जन औषधी व अमृत औषधालये सुरू करा – जिल्हा रुग्णालयात तत्काळ सुविधा उपलब्ध करून द्या.🔹 नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कारवाई – आरोग्यसेवेत दोष आढळल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होईल.🔹 ‘निक्षयमित्र’ योजनेत सर्वांचा सहभाग – क्षयरोग निर्मूलनासाठी स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांचा सक्रिय सहभाग आवश्यक.🔹 ग्रामीण आरोग्य सुविधांची गुणवत्ता वाढवा – प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये भौतिक सुविधा आणि इमारती दर्जेदार असाव्यात.🔹 जन्मदर व मृत्युदराचा बारकाईने अभ्यास – सुधारणा आवश्यक त्या ठिकाणी त्वरित कृती करा. सर्व विभाग प्रमुखांना एकजूटने काम करण्याचे आवाहन मंत्री महोदयांनी सर्व आरोग्य यंत्रणेला सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन करत, “शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी कामात कुचराई खपवून घेतली जाणार नाही”, असा इशाराही दिला.

कामात कुचराई करणाऱ्यांची गय नाही; शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवा – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव Read More »

नंदुरबार जिल्ह्यात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची त्रैमासिक आढावा बैठक संपन्न

दिनांक: 10 मार्च 2025स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) यांची त्रैमासिक आढावा बैठक दिनांक 10 मार्च 2025 रोजी पार पडली. जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील आरोग्यसेवा सुधारणा, लाभार्थ्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उपाययोजना आणि योजनांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. बैठकीस उपस्थित मान्यवर: ✅ डॉ. मिताली शेट्टी – जिल्हाधिकारी, नंदुरबार✅ डॉ. के. डी. सातपुते – जिल्हा शल्यचिकित्सक✅ डॉ. नरेंद्र सोनावने – जिल्हा आरोग्य अधिकारी✅ डॉ. चेतन कुमार देशले – जिल्हा समन्वयक✅ तसेच आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि योजनेंतर्गत समाविष्ट खाजगी रुग्णालयांचे संचालक बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे: ✔ योजनांच्या लाभांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर✔ लाभार्थ्यांना विनाविलंब आणि सुलभ पद्धतीने सेवा मिळण्यासाठी सुधारणा प्रस्तावित✔ योजनांच्या कार्यान्वयनातील अडथळे व उपाययोजना जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की, नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना या योजनांचा पूर्ण लाभ मिळावा, यासाठी विशेष प्रयत्न करावेत. लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काची मोफत आरोग्य सेवा सहज मिळावी, यासाठी जागरूकता मोहीम राबवावी, असेही निर्देश देण्यात आले. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना – नागरिकांसाठी सुवर्णसंधी ➡ ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार – पात्र कुटुंबांसाठी मोठा आर्थिक आधार➡ १३५६ प्रकारच्या उपचार आणि शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध➡ देशभरातील २५,०००+ रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचार सुविधा➡ महिला, वृद्ध, मुले आणि दिव्यांगांसाठीही संपूर्ण वैद्यकीय मदतीची हमी नागरिकांना आवाहन – आपले आयुष्मान कार्ड त्वरित तयार करा! योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र नागरिकांनी आयुष्मान भारत कार्ड तयार करणे आवश्यक आहे. हे कार्ड सहज मिळण्यासाठी खालील ठिकाणी संपर्क साधावा: 📍 आपले सरकार सेवा केंद्र📍 आशा स्वयंसेविका📍 रास्त भाव धान्य दुकानदार📍 योजनेशी संलग्न रुग्णालये आवश्यक कागदपत्रे: ✔ राशन कार्ड✔ आधार कार्ड✔ पात्रता यादीतील नाव (SECC सूची किंवा राज्य सरकारच्या योजनांमध्ये नोंदणी आवश्यक) नंदुरबार जिल्हा प्रशासनाचा संदेश: “नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांनी या आरोग्य योजनांचा लाभ घ्यावा आणि आरोग्याची संपूर्ण जबाबदारी शासनाच्या या उपक्रमांतर्गत स्वीकारावी. गरजू रुग्णांनी कोणत्याही आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.“

नंदुरबार जिल्ह्यात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची त्रैमासिक आढावा बैठक संपन्न Read More »

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.