Global News

Health related news all over the world.

कामात कुचराई करणाऱ्यांची गय नाही; शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवा – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

बुलढाण्यात आरोग्य विभागाच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत स्पष्ट निर्देश बुलढाणा, ४ जुलै:गोरगरीब आणि शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, माफक आणि सुलभ आरोग्य सेवा पोहोचवणे हे केंद्र सरकारचे मुख्य उद्दिष्ट असून, या उद्दिष्ट पूर्तीसाठी आरोग्य यंत्रणेला प्रामाणिकपणे कार्य करावे लागेल. कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कोणतीही गय न ठेवता कठोर कारवाई करा, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार), आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित झालेल्या जिल्हास्तरीय आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत मंत्री महोदयांनी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला. बैठकीत प्रमुख उपस्थिती: मंत्री महोदयांचे महत्त्वाचे निर्देश: 🔹 रिक्त पदे तात्काळ भरा – जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये रिक्त पदांचा आढावा घेऊन आवश्यक ती भरती तातडीने पार पाडा.🔹 PMJAY अंतर्गत शिबिरे घ्या – आयुष्मान भारत योजनेंतर्गत ई-केवायसी व कार्ड नोंदणीसाठी ग्रामपंचायत व तालुकास्तरावर विशेष शिबिरे आयोजित करा.🔹 जन औषधी व अमृत औषधालये सुरू करा – जिल्हा रुग्णालयात तत्काळ सुविधा उपलब्ध करून द्या.🔹 नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कारवाई – आरोग्यसेवेत दोष आढळल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होईल.🔹 ‘निक्षयमित्र’ योजनेत सर्वांचा सहभाग – क्षयरोग निर्मूलनासाठी स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांचा सक्रिय सहभाग आवश्यक.🔹 ग्रामीण आरोग्य सुविधांची गुणवत्ता वाढवा – प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये भौतिक सुविधा आणि इमारती दर्जेदार असाव्यात.🔹 जन्मदर व मृत्युदराचा बारकाईने अभ्यास – सुधारणा आवश्यक त्या ठिकाणी त्वरित कृती करा. सर्व विभाग प्रमुखांना एकजूटने काम करण्याचे आवाहन मंत्री महोदयांनी सर्व आरोग्य यंत्रणेला सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन करत, “शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी कामात कुचराई खपवून घेतली जाणार नाही”, असा इशाराही दिला.

कामात कुचराई करणाऱ्यांची गय नाही; शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवा – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव Read More »

विश्व स्वास्थ्य दिवस 2025: स्वस्थ शुरुआत से सजेगा आशापूर्ण भविष्य | World Health Day 2025

लेखक: Healthsinfos.in डेस्कप्रकाशित तिथि: 7 अप्रैल 2025 हर वर्ष 7 अप्रैल को विश्व स्वास्थ्य दिवस (World Health Day) के रूप में मनाया जाता है, और इस वर्ष 2025 की थीम है – “स्वस्थ शुरुआत, आशापूर्ण भविष्य” (Healthy Beginnings, Hopeful Futures)। यह विषय विशेष रूप से मातृ एवं नवजात स्वास्थ्य पर केंद्रित है, जो हमारे समाज की नींव को मजबूत करता है। भारत में विश्व स्वास्थ्य दिवस 2025 का महत्व भारत सरकार और विश्व स्वास्थ्य संगठन (WHO) ने इस थीम के माध्यम से मातृ मृत्यु दर को घटाने, नवजात शिशुओं की बेहतर देखभाल सुनिश्चित करने और प्राथमिक स्वास्थ्य सेवाओं को मजबूत करने की दिशा में बड़ा संदेश दिया है। इस दिन को देशभर में स्वास्थ्य जागरूकता अभियान, स्वास्थ्य शिविरों, जन संवाद, और डिजिटल हेल्थ सेवाओं की भागीदारी के साथ मनाया गया। भारत सरकार की प्रमुख स्वास्थ्य योजनाएं जो भविष्य को संवार रही हैं: राज्यवार आयोजनों की झलक: महाराष्ट्र: मुंबई, पुणे, और नागपुर सहित विभिन्न शहरों में स्वास्थ्य शिविर, टीकाकरण कार्यक्रम और महिला स्वास्थ्य वर्कशॉप्स का आयोजन किया गया। ग्रामीण क्षेत्रों में मोबाइल हेल्थ यूनिट्स ने मुफ्त जांच की सुविधा दी। गुजरात: ममता अभियान के अंतर्गत गर्भवती महिलाओं और नवजातों को पोषण व स्वास्थ्य सेवा उपलब्ध कराई गई। टेलीमेडिसिन से सुदूर इलाकों में विशेषज्ञ डॉक्टरों की सलाह मिल रही है। कर्नाटक: ई-संजीवनी और डिजिटल हेल्थ रिकॉर्ड के माध्यम से हेल्थ टेक्नोलॉजी को प्राथमिक स्वास्थ्य सेवा से जोड़ा गया। राजस्थान: जन औषधि केंद्रों की संख्या में वृद्धि कर, आम जनता को किफायती दवाएं उपलब्ध कराई जा रही हैं। विशेष टीकाकरण कार्यक्रमों के माध्यम से नवजात मृत्यु दर में गिरावट दर्ज की गई। चंडीगढ़: PGIMER और IPHA के सहयोग से शैक्षणिक सेमिनार और स्वास्थ्य परामर्श सत्र आयोजित हुए, जिसमें मातृ स्वास्थ्य के महत्व पर विशेष चर्चा की गई। विश्व मंच पर भारत की पहल नई दिल्ली में आयोजित होने जा रही World Health Summit Regional Meeting 2025 में भारत की भागीदारी से यह स्पष्ट होता है कि देश वैश्विक स्वास्थ्य कूटनीति में अग्रणी भूमिका निभा रहा है। इस बैठक में डिजिटल स्वास्थ्य, समानता, और आवश्यक स्वास्थ्य सेवाओं पर जोर रहेगा। निष्कर्ष: स्वस्थ कल की नींव आज रखनी होगी विश्व स्वास्थ्य दिवस 2025 पर भारत ने यह साबित किया है कि अगर शुरुआत स्वस्थ हो, तो भविष्य उज्ज्वल और आशावान होता है।स्वास्थ्य केवल शरीर की नहीं, समाज और राष्ट्र की प्रगति का आधार है। “स्वस्थ रहें, जागरूक रहें – क्योंकि आज की सावधानी, कल की सुरक्षा है।”

विश्व स्वास्थ्य दिवस 2025: स्वस्थ शुरुआत से सजेगा आशापूर्ण भविष्य | World Health Day 2025 Read More »

क्वाड कार्यशाळेच्या उद्घाटनाने आरोग्य सुरक्षेसाठी नवे पर्व!

क्वाड कार्यशाळेच्या उद्घाटनाने आरोग्य सुरक्षेसाठी नवे पर्व! नवी दिल्ली, १८ मार्च २०२५ – केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मा. अनुप्रिया पटेल यांनी आज इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील महामारी पूर्वतयारीसाठी क्वाड कार्यशाळेचे उद्घाटन केले. या कार्यक्रमादरम्यान, आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या महत्त्वावर भर देत, त्यांनी सांगितले की क्वाड देशांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे जागतिक आरोग्य सुरक्षेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. या उपक्रमामुळे सामाजिक लवचिकता आणि संपूर्ण आरोग्य संरचना अधिक मजबूत होण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने हा उपक्रम मोठा टप्पा ठरणार आहे, असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला. सर्वसमावेशक व एकात्मिक आरोग्य सुरक्षा चौकट निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम मोलाचा ठरेल आणि भविष्यात सुरक्षित व निरोगी समाज घडवण्यासाठी हातभार लावेल, असे त्या म्हणाल्या. क्वाड देशांची आरोग्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण भूमिका क्वाड (Quad) म्हणजेच भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांचा गट, जो आरोग्य, तंत्रज्ञान, सुरक्षा आणि विकासाच्या विविध मुद्द्यांवर सहकार्य करतो. महामारीसारख्या आपत्कालीन परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी क्वाड देशांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेली आरोग्य सुरक्षा यंत्रणा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या कार्यशाळेत महामारी व्यवस्थापन, आरोग्य यंत्रणांचे बळकटीकरण आणि भविष्यातील धोके टाळण्यासाठी उपाययोजना यांवर सखोल चर्चा करण्यात आली. तसेच, क्वाड देशांमधील तज्ज्ञ, संशोधक आणि धोरणकर्त्यांनी सहभाग घेऊन विविध आरोग्य धोरणांवर मंथन केले. महामारीपूर्व तयारी – भारताची भूमिका महत्त्वाची! भारताने कोविड-१९ महामारीच्या काळात “वसुधैव कुटुंबकम्” या तत्त्वावर आधारित अनेक देशांना मदत केली. “मेड इन इंडिया” लसीकरण मोहीम, औषध-पुरवठा आणि तंत्रज्ञानाधारित उपाययोजना यामुळे भारताने जागतिक आरोग्य सुरक्षेच्या दिशेने महत्त्वाचे योगदान दिले आहे. ही कार्यशाळा महामारीच्या पुढील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नव्या संधी निर्माण करेल आणि क्वाड देशांच्या सहकार्याने एक मजबूत आरोग्य सुरक्षा प्रणाली उभारली जाईल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.

क्वाड कार्यशाळेच्या उद्घाटनाने आरोग्य सुरक्षेसाठी नवे पर्व! Read More »

हत्तीरोग मुक्त महाराष्ट्रासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीम – आरोग्य विभागाची मोठी पाऊलवाट!

हत्तीरोग मुक्त महाराष्ट्रासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीम – आरोग्य विभागाची मोठी पाऊलवाट! https://dhunt.in/Z9v5U By Health’s Infos via Dailyhunt

हत्तीरोग मुक्त महाराष्ट्रासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीम – आरोग्य विभागाची मोठी पाऊलवाट! Read More »

Headline: JP Nadda Reaffirms Commitment to Healthier India on Ayushman Bharat\’s Sixth Anniversary

“Ayushman Bharat-PMJAY is the cornerstone of a stronger, Viksit Bharat,” says BJP President. Date: September 23, 2024 New Delhi: On the occasion of the sixth anniversary of Ayushman Bharat-Pradhan Mantri Jan Arogya Yojana (AB-PMJAY), BJP National President JP Nadda emphasized the importance of a healthy population in driving the prosperity of the nation. In a social media post, Nadda celebrated the achievements of the scheme, highlighting the collaborative efforts of the government, healthcare providers, and the public in shaping India\’s healthcare future. “A healthy population is better equipped to contribute to the country\’s growth, productivity, and innovation,” Nadda remarked. He described Ayushman Bharat as pivotal to the vision of \”Viksit Bharat,\” stressing its role in creating an inclusive and accessible healthcare system for all. Success of AB-PMJAY The Ayushman Bharat-PMJAY, launched in 2018, has provided free healthcare coverage to over 500 million beneficiaries across India, offering cashless treatment for secondary and tertiary care. Nadda praised the scheme for not only expanding healthcare access but also empowering the underserved populations, enabling millions to access critical medical services without financial burdens. Commitment to Healthcare for All On the scheme\’s anniversary, Nadda called for renewed dedication to building a compassionate healthcare system that ensures no one is left behind. \”Together, we will continue building a healthier India for generations to come,\” he stated. He further invited the public to read his detailed insights on Ayushman Bharat and India\’s healthcare journey in his latest article published by Hindustan Times, titled “Securing a Healthier Future for a Viksit Bharat.\” The full article can be accessed via the Hindustan Times website. Conclusion The AB-PMJAY scheme is a major milestone in India’s healthcare reforms, and on its sixth anniversary, leaders like JP Nadda reaffirm the government’s commitment to a healthier and more prosperous India. #ABPMJAY #Ayushman Bharat

Headline: JP Nadda Reaffirms Commitment to Healthier India on Ayushman Bharat\’s Sixth Anniversary Read More »

मोठी बातमी! ‘आयुष्यमान भारत’ योजनेतून आता रुग्णांना 1356 आजारांवर 5 लाखांचे मोफत उपचार, वाचा काय आहे नेमकी योजना, कोणाला मिळू शकतो लाभ आणि बनवून घ्या स्वतःच्या ‘आयुष्मान कार्ड’ स्वतःच !

नाशिक : आयुष्यमान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजना आता एकत्रितपणे राबविली जात असून त्यामधून प्रत्येक कुटुंबातील रुग्णास १३५६ आजारांवर मोफत उपचाराची संधी आहे. नवजात शिशुपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वजण या योजनेचा लाभ घेवू शकतात.रुग्णांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन केंद्र व राज्य सरकारने प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी पाच लाख रुपयांचे मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रत्येक घटकाला शासनाच्या माध्यमातून मोफत उपचार मिळावेत, या हेतूने आयुष्यमान भारत योजनेचा निर्णय झाला. राज्य सरकारने गतवर्षी महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना एकत्रित राबविण्याचा निर्णय घेतला. सरकारी नोकरदारापासून सामान्य व्यक्तींपर्यंत सर्वांनाच आता ही योजना लागू आहे. पिवळे, केशरी, शुभ्र रेशनकार्ड असलेल्या कुटुंबातील व्यक्ती देखील \’आयुष्यमान कार्ड\’ काढून योजनेचा लाभ घेवू शकतो. सध्या जिल्ह्यातील 78 रुग्णालयात या योजनेतून मोफत पाच लाखांपर्यंत उपचार मिळतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित कुटुंबातील रुग्णाने गावातील ऑनलाइन सेवा केंद्रातून आशाताईंमार्फत आयुष्यमान कार्ड काढून घेणे आवश्यक आहे. एवढेच नव्हे तर लाभार्थी स्वतः आहे मोबाईलवर आयुष्यमान ॲप डाऊनलोड करून स्वतःचे व आपल्या परिजनांचे आयुष्मान कार्ड बनवून घेऊ शकतात. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये 07 जिल्ह्यातील खासगी रुग्णालये 71 आयुष्यमान कार्ड बनवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आयुष्यमान ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

मोठी बातमी! ‘आयुष्यमान भारत’ योजनेतून आता रुग्णांना 1356 आजारांवर 5 लाखांचे मोफत उपचार, वाचा काय आहे नेमकी योजना, कोणाला मिळू शकतो लाभ आणि बनवून घ्या स्वतःच्या ‘आयुष्मान कार्ड’ स्वतःच ! Read More »

शासन आपल्या दारी कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी दिली आयुष्यमान भारत योजनेच्या स्टॉलला भेट

शासन आपल्या दारी कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी दिली आयुष्यमान भारत योजनेच्या स्टॉलला भेट Read More »

#Ayushman #Card Distribution & #Health #Camps #Nashik : #नाशिक जिल्हयात आजपासून #आयुष्यमान कार्ड वितरण मोहीम व #महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन

नाशिक : जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत जिल्हयामध्ये १५ ते ३१ डिसेंबर २०२२२ पर्यंत महाआरोग्य  मिळावे घेण्यात येत आहेत. जिल्हाभरातील १०६ प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ५९२ आरोग्य उपकेंद्र, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, यांच्या समन्वयातून हे शिबिर राबवले जाणार आहे. (Mahaarogya camps in district from today Nashik Health Camps) पालकमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हयात महाआरोग्य मेळाव्यांचे आयोजन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा परिषद आरोग्य विभाग, एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, जिल्हा रुग्णालय, सर्व ग्रामीण रुग्णालय यांच्या समन्वयाने हे शिबिर होणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र या ठिकाणी तयारी करण्यात येत आहे. या शिबिरात ग्रामीण भागातील रुग्णांची तपासणी आरोग्य उपकेंद्र स्तरावर समुदाय आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. निदान व उपचार मोफत केले जाणार आहे. तसेच आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचेलाभार्थी असलेल्या लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड बनवून देणे करितामोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी सर्व स्तरावरून पोस्टर बॅनर यामार्फत जनजागृती करण्यात येत आहे. या तपासण्या होतील! आरोग्य शिबिरामध्ये आरोग्य तपासणी हृदयरोग, रक्तदाब, डोळे तपासणी, मोतीबिंदू, टीबी ची तपासणी, दंतरोग, नाक कान घसा, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, हाडांची तपासणी अशा विविध तपासण्या करण्यात येणार आहेत. यामध्ये गुंतागुंत अथवा तज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याची गरज भासल्यास संदर्भ सेवेची सेवा दिली जाणार आहे. ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज आहे, अशांसाठी जानेवारीमध्ये शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. जिल्हा परिषदेतील मुख्यालयातून या शिबिराचे सनियंत्रण केले जाणार असून शक्य तितक्या शस्त्रक्रिया ह्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य  योजने अंतर्गत करण्यात येणार आहेत. पूर्वतयारीसाठी जिल्हास्तरीय परिवेक्षक त्या-त्या तालुक्यांना मार्गदर्शन करीत आहेत. शिबिराची तयारी अंतिम टप्प्यात आली असून या शिबिराचा लाभ जिल्हयातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन जिल्हयाचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी, श्रीमती मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहेते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. कैलास भोये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. युवराज देवरे, एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे क्षेत्रीय व्यवस्थापक डॉ कुलदीप शिरपूरकर, जिल्हा समन्वयक डॉ. पंकज दाभाडे, विभाग प्रमुख डॉ तुषार मोरे, जिल्हा प्रमुख डॉ राहुल सोनवणे व वैद्यकीय अधिकारी डॉ संकीत साखला यांनी केले आहे.

#Ayushman #Card Distribution & #Health #Camps #Nashik : #नाशिक जिल्हयात आजपासून #आयुष्यमान कार्ड वितरण मोहीम व #महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन Read More »

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.